Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
Breaking Newsअंतरराष्ट्रीयभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकारणव्यवसायव्हिडिओसामाजिक

shiv sena ncp : भाजपबाबत राष्ट्रवादी ‘सॉफ्ट’ का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शरद पवारांकडे नाराजी

मुंबई : महाविकास आघाडीतील धुसफूस आता चव्हाट्यावर येताना दिसते आहे. ‘ईडी’च्या कारवाईवरून शिवसेनेने भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ( uddhav thackeray called sharad pawar ) भाजपच्या काही नेत्यांसंबंधी कागदपत्रे आणि पुरेवेही पोलिसांना दिली आहेत. पण गृहखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पुरावे देऊनही पुढे काही कारवाई होताना दिसत नाहीए, यावरून शिवसेना नारज असल्याचं बोललं जातंय.

शिवसेना भाजपविरोधात दंड थोपटून उभी असताना राष्ट्रवादी काँग्रेस नरमाईची भूमिका घेत असल्याने शिवसेना नाराज असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त दिलं आहे.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई होत आहे. अनेक नेते ‘ईडी’ आणि प्राप्तिकर विभागाच्या रडावर आहेत. आधी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासह शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक, संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यांशी संबंधित कंपन्यांवर कारवाई झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपविरोधा शिवसेना आक्रमक आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस मात्र नरमाईची भूमिका घेत असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे.

शिवसेनेनं राष्ट्रवादीच्या भूमिकेवर बोट ठेवत काही उदाहरणंही दिली आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी चौकशी चौकशीला बोलावलं. पण नंतर गृह खात्यानं निर्णय बदलला आणि पोलीस फडणवीसांच्या घरी गेले. आक्रमक शिवसेनेला हे खटकलं. पोलिसांनी ज्या प्रकारे प्रकरण हाताळं त्यावर शिवसेना समाधानी नाही.

३१ मार्चनंतर एसटी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होऊ शकते?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांच्या अटकेवरूनही राष्ट्रवादीने घेतलेली भूमिका शिवसेनेला पटली नाही. मलिकांच्या अटकेवरून शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल केला. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक भूमिका न घेता शिवसेना आणि भाजपने शांत व्हावं, अशी सामंजस्याची भूमिका घेतली.

सतीश उके यांना ‘ईडी’ने ताब्यात घेताच नाना पटोलेंचा संताप, ट्विट करत म्हणाले…

भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावरूनही अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली होती. आमदारांना काही तास किंवा काही दिवसांपूरता निलंबित केलं जाऊ शकतं. पण संपूर्ण वर्षासाठी निलंबित करणं हा कालावधी अधिक असल्याचं अजितदादा म्हणाले होते. यामुळेच शिवसेना नाराजी व्यक्त केली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई आणि भाजपविरोधात शिवसेना आणि पक्षाचे नेते लढत आहेत. पण राष्ट्रवादी मात्र बॅकफुटवर आहे. राष्ट्रवादी भाजपशी दोन हात करताना दिसत नाहीए. भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणा नेत्यांना लक्ष्य करत आहेत. गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे असतानाही कुठलीही अपेक्षित कारवाई होताना दिसत नाहीए, असं शिवसेनेच्या एका नेत्याने म्हटलंय. राष्ट्रवादीचे नेते भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना म्हणाले, असं सूत्रांनी सांगितलं. यामुळे सतत भाजपवर हल्लाबोल करणारे संजय राऊत आता काहीसे शांत असल्याचं दिसून येत आहेत, असं बोललं जातंय.

महत्तवाचा लेख३१ मार्चनंतर एसटी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होऊ शकते?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Related posts

Satish Ukey : हायप्रोफाईल वकील ते राजकारणात उठबस, ईडीच्या रडारवर असणारे कोण आहेत सतीश उके?

cradmin

मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्या पाद्रयावर गुन्हा नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ !

dhakkadayak

पोलिसाची हिम्मत! लग्नाच्या वाढदिवसाला म्हणाला पश्चाताप दिन; सुट्टीचा अर्ज वाचून तुम्हीही हसाल

cradmin

Leave a Comment